नुकतीच माझी निवड रूरल ईलेट्रेफिकेशन कॉर्पोरेशनच्या संचालक पदी करण्यात आली आहे.हे पद स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. देशातील ग्रामीण भागात वीज पोहचण्याचे कार्य आता मी पार पाडणार आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाचा व राज्याचा विकास होईल हे निश्चित.
आरईसीचे कार्यक्षेत्र हे विस्तृत असून उत्कृष्ट दर्जेचे आहे. वाढीव वाढीसाठी आणि ग्रामीण व शहरी लोकसंख्येच्या जीवनमानाचा समृध्दतेसाठी विजेचे उपलब्धता सुलभ करण्यासाठी आरईसी कार्यरत आहोत. देशात वीजनिर्मिती, वीजसंरक्षण, वीज वितरण आणि वीज वितरण नेटवर्क समाविष्ट करणाऱ्या वीज प्रकल्पांना वित्तपुरवठा आणि प्रसार करण्यासाठी स्पर्धात्मक ग्राहक-अनुकूल आणि विकास आधारित संघटना म्हणून कार्य करते.
मराठवाडा विकास महामंडळाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर मराठवाड्याचा अनुरोष भरून काढण्याचे कार्य मला पार पाडायचे आहे. मराठवाड्याचा अनेक ग्रामीण भागात आजही वीज यौग्य प्रमाणात पोहचल्याली नाही मराठवाड्याला लागणाय्रा विजेच्या केवळ निम्मी विजेचीच निर्मिती आज होत आहे. वीज पुरवणा मुबलक व सुरळीत होण्यासाठी प्रथम वीजनिर्मितीचे स्तोत्र तयार करावे लागणार व त्यासाठी आपल्या विभागासाठी कुठला ऊर्जास्तोत्र हा उत्तम आहे जसे कि जलयुक्त शक्ती ऊर्जा, पवन ऊर्जा(Wind Power), औष्णिक ऊर्जा (Thermal Power) उष्मीय शक्ती (Coal Power), याचा अभ्यास करून त्यावर यौग्य मार्गदर्शन घेऊन त्यांची एक ब्लू प्रिंट बनवुन ती राज्य सरकारला सुपूर्द करणार. व त्यानुसार यौग्य तो ऊर्जा स्तोत्र निर्मितीची परवानगी राज्य सरकार कडून घेणार. झालेल्या नियुक्ती चा यौग्य वापर करत राज्य सरकारकडे हे स्तोत्र उभे करण्यास मुबलक पैसे नसल्यास तो आरईसी द्वारा उपलब्ध करून देणार व मराठवाड्यातिल गावागावात प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचे कार्य मी पार पाडणार.
गावागावात प्रत्येक घरात सर्व गरजूंना वीज मिळावी यासाठी जर माझा हातभार लागत असेल तर ते माझे भाग्य समजेल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी इथवर पोहचलोय आपले प्रेम व सहकार्य मला सातत्याने सत्कार्य करण्याची प्रेरणा देत राहतील हीच सदिच्छा. सबका साथ सबका विकास जय हिंद!!